Tuesday, December 30, 2008

Fire of Hiroshima - Marathi
Jonathan Livginston seagull - Marathi
Light the lamp within - Marathi
Rats - Marathi
Three Days to see - Marathi
Web of Life -(Marathi)
positivism - by R. Mashelkar

Monday, December 22, 2008

काळे गाणे

१ Best poem nomination for २००५

When I born, I black,
When I grow up ,i black,
When I go in Sun, I black,
When I scared, I black,
When I sick, I black,
And when I die, Im still black,

And u white fella,
when u born, u pink,
When u grow up, u white,
When u go in sun, u red,
When u cold, u blue,
When u scared, u yellow,
When sick, उ green,
And when u die, u gray,
And u calling ME coloured???

२ On a British Airways flight from Johannesburg, a middle-aged, well-off white South African Lady has found herself sitting next to a black man। She called the cabin crew attendant over to complain about her seating। "What seems to be the problem Madam?" asked the attendant। "Can't you see?" she said " You've sat me next to a kaffir. I can't possibly sit next to this disgusting human. Find me another seat!" "Please calm down Madam." the stewardess relied. "The flight is very full today, but I'll tell you what I'll do-I'll go and check to see if we have any seats available in club or first class." The woman cocks a snooty look at the outraged black man beside her (not to mention many of the surrounding passengers). A few minutes later the stewardess returns with the good news, which she delivers to the lady, who cannot help but look at the people around her with a smug and self satisfied grin: "Madam, unfortunately, as I suspected, economy is full. I've spoken to the cabin services director, and club is also full. However, we do have one seat in first class." Before the lady has a chance to answer, the stewardess continues ... "It is most extraordinary to make this kind of upgrade, however, and I have had to get special permission from the captain. But, given the circumstances, the captain felt that it was outrageous that someone be forced to sit next to such an obnoxious person." With which, she turned to the black man sitting next to the woman, and said: "So if you'd like to get your things, sir, I have your seat ready for you..." At which point, apparently the surrounding passengers stood and gave a standing ovation while the black guy walks up to the front of the plane.
people will forget what you said .... people will forget what you did .... but people will never forget how you made them feel.

हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे काल सकाळ मध्ये मुक्ता मनोहर यांचा मरियम मकेबा यांच्यावर लेख आहे. मरियम मकेबा यांच्या आत्म्चरित्राचा मराठी अनुवाद ’काळे गाणे’ सुमारे १० वर्षांपूर्वी वाचला होता. साऊथ आफ़िकेतील चालीरीती, अंधश्रध्दा आणि काळ्या वर्णासाठी व एक स्त्री म्हणून अशा दोन्ही पातळ्यांवर मरियम मकेबा यांनी किती लढा दिला हे त्या पुस्तकात प्रभावीपणे मांडले आहे.

एक होता कार्व्हर या पुस्तकातही कार्व्हर यांना काळे असण्याचा कसा त्रास सहन करावा लागतो हे येते.

मरियम मकेबा ११ नोव्हेंबर २००८ रोजी एका गाण्याच्या कार्यक्रमात असताना गेल्या. पुस्तकाची आठवण आली त्यानिमित्ताने हे लिखाण.

Friday, December 19, 2008

ATM व कही दूर जब दिन ढल जाये


ATM मधून पॆसे काढले. बाहेर आले तर एक college मधील मॆत्रिण दिसली. अनेक वर्षांनी भेटत होतो. त्यामुळे एकदम “तू, कुठे होतीस, आज इकडे कुठे” वगॆरेचा हलकल्लोळ झाला. (तोपर्यंत

तिचा सोबत असलेला नवरा पुतळा होऊन उभा होता…..!!)

मग एकदा भेटू, तो / ती आजकाल कुठे असते याची चौकशी व मोबाईल नं. ची देवाणघेवाण होऊन ती भेट संपली. मग दोन दिवसांनी माझ्या मोबाईलवर एका मुलीचा आवाज, “काय ओळखलंस का?” मी लगेच तिचा आवाज ओळखून तुला नंबर कोणी दिला तेही लक्षात आले असे सांगितले. मग एकदा असे सगळे college मधील चार-पाच जण भेटलो.

त्यातल्या एका मित्राचा भेटीनंतर दोन दिवसांनी फ़ोन आला. म्हणाला, मध्यंतरी कपाट आवरताना जुन्या वह्या सापड्ल्या. त्यातील chemistry च्या वहीत ’कही दूर जब दिन ढल जाये’ हे तू लिहून सुवाच्च अक्षरात लिहून दिलेलं गाणं सापडलं. खूप छान वाटलं.

मी ती वही, त्यातील गाणं सगळंच अर्थात विसरले होते. या निमित्ताने मग अनेक आठवणी काढल्या.

आनंद या सिनेमामधील हे गाणं सगळ्यांना आवडतं.. पण मला त्याहून जास्त आवडतं ते ..

मौत तू एक कविता हॆ
मुझसे एक कविता का वादा हॆ मिलेगी मुझको
डूबती नब्जोंमें जब दर्द को नींद आने लगे
जर्द सा चेहरा लेकर जव चांद उफ़क तक पहुंचे
दिन अभी पानी में हो, रात किनारे के करीब
ना अंधेरा ना उजाला हो, ना अभी रात ना दिन
जिस्म जब खत्म हो और रुह को जब सांस आये
मुझसे एक कविता का वादा हॆ मिलेगी मुझको…

Monday, December 15, 2008

अस्वस्थ अक्षरांच्या गर्दीत हिंडताना…


भल्या पहाटे सिंहगड चढलो.. चंद्र आकाशात दिसत होता. मस्त वाटले. वर जाऊन नेहमीप्रमाणे खेकडा भजी, दही, भाकरी, पिठलं खाल्लं. उतरायला सुरुवात केली. ८-१० वर्षाची २०-२५ मुलेमुली दिसली. कुठून आली आहेत विचारल्यावर रायगड असे कळले. त्यातल्या एका मुलीच्या हातात जड सामान, दुस-या हातात ओढणी.. मग माझा सोबती तिला म्हणाला.. चिमणे, तुझी ओढणी बांधून देतो. त्याने मस्तपॆकी तिच्या कमरेला ओढणी नीट बांधली. आता जरा तिला चढणे सोपे जाईल..

पुढे गेलो तर अजून एक बालचमू.. उरणहून आलेत असे कळले. समारंभाला जावे तसे पोशाख करुन सर्वजण आले होते. पुढे गेलो तर त्या मुलांच्या शिक्षिका एका माणसाचे आभार मानताना दिसल्या. त्या माणसाला सिंहगडाच्या पायथ्याशी एक चिमुकली पर्स सापडली होती. शाळेतील मुलीची होती असे सांगणारे कोणी भेटले. मग तो आत्ताच उतरुन गेला होता तरी परत चढायला लागला. साधारण १/३ वर चढल्यावर भेट्लेल्या त्या शिक्षिकेने ती पर्स ओळखली. त्यात ३० रुपये होते. त्या माणसाशी बोलल्यावर तो म्हणाला.. आपण शाळेत असताना ५ रुपये सुध्दा आपल्याला किती होते. मग त्या मुलीला हे ३० रुपये महत्वाचे असणार, या विचाराने मी येथपर्यंत आलो।
रोजच्या वर्तमानपत्रातील पॆशासाठी खून, मारहाण, फ़सवणूक इ. बातम्या वाचतो. या अनुभवाने रविवार एकदम आनंदात गेला. असेही अजून घडते तर.. !

Saturday, December 13, 2008

Not one less.. एकसुध्दा कमी नको.



चीनमधील डोंगराळ भागातील एक गाव – शुइजियान। कोणत्याही खेडेगावासारखे नापिक जमिनीने व दारिद्र्याने गांजलेले। गावची लोकसंख्या जेमतेम हजारभर आहे। गावातले लोक मोलमजुरी करतात। मिळेल ते आणि मिळाले तर खातात, अगदीच नाही तर जवळच्या शहरात निघून जातात. मागे उरतात ती मजुरी करायला निरुपयोगी - म्हातारी माणसे व लहान मुले.

गावात म्हणायला एक प्राथमिक शाळा आहे। तुटके गळके छप्पर, मोडकळीस आलेले बाक आणि त्यासारखेच गरिबीने वॆतागलेले मास्तर। त्यांच्या चेह-यावरच्या सुरकुत्यात आणि कपाळावरच्या आठ्यात ते स्पष्ट दिसते॥ शाळेत एकच वर्ग आहे आणि सर्व इयत्तांमधील मुले पॆशाअभावी त्या एकाच वर्गात बसतात. त्यातील चार-पाच मुले मास्तरांबरोबरच राहतात. मुलांना खायला मिळायचा खर्च निघावा म्हणून मास्तर खडू सुध्दा जपून वापरतात. अक्षरे लहान काढतात. यात भर पडते ती त्यांची आई आजारी आहे म्हणून निरोप आल्यावर॥ त्यांच्या जागी शाळेतील २८ मुलांना शिकवणार कोण ? सहा सहा महिने पगार न मिळणा-या शाळेत स्वत:हून नोकरीवर कोण येणार ? त्यात कायदे कडक आहेत. बदलीचा शिक्षक आल्याशिवाय ते सुट्टीवर जाऊच शकत नाहीत.

गावचा सरपंच शेजारच्या गावातील एका १३ वर्षांच्या मुलीला तयार करतो. तिचे नाव वेई मिंजी. शिक्षक तिला पाहून चकितच होतात. वेई स्वत: माध्यमिक शाळेत गेलेली नाही. माओची स्तुती करणा-या गाण्याच्या दोन ओळी सोडल्या तर तिला फ़ारसे काही येत नाही. मात्र तिला पुस्तकातून पाहून नीट लिहिता येते. बस्‌.. एवढ्या पात्रतेवर शिक्षक तिला तिचे काम व २६ दिवसांचे २६ खडू देऊन निघून जातात. उन्हे वर येईपर्यंत मुलांना गुंतवून ठेवण्याचा मौलिक सल्ला मात्र तिला देतात.

वेई त्यांना विचारते की “उन पडलेच नाही तर”.. ती स्वत: किती अननुभवी आहे आणि निरागस आहे हे या प्रसंगात दिग्दर्शकाने उत्तम दाखविले आहे.

याच संभाषणात पुढे मास्तर सांगतात की ते परत येईपर्यंत एकही विद्यार्थी कमी झालेला नको.. not one less..

मिंजीचा ४० युआन पगार कोण देणार हे मात्र सरपंच व मास्तर दोघेही सांगत नाहीत. सांगतात एकच ’सर्व विद्यार्थी मास्तर सुट्टीवरुन परत येईपर्यंत टिकून राहिले तर ते १० युआन बक्षीस देतील.”

शिक्षिकेला अनुभव नाही व मुले तर मुलेच आहेत. व्रात्य आणि दंगेखोर. मिंजी त्यांनी गिरवण्यासाठी फ़ळाभरुन छोटी छोटी अक्षरे काढते व बाहेर जाऊन बसते. मोकळी सुटलेली मुले थोडाच अभ्यास करणार आहेत ? ती भांडण सुरुच करतात, वेण्या ओढणे, चिमटे काढणे सुरु. मिंजीला सांगतात.. फ़ळ्यावर लिहिलेले आम्हाला समजत नाही. ती म्हणत राहाते.. “लिहा”. (शिक्षणपध्दतीवर प्रकाश टाकणारा हा सीन आहे.) मुलांच्या दंग्यावर आणि तक्रारींवर तिच्याकडे एकच उत्तर आहे. ते म्हणजे “लिहा”.. तीही काही कमी हट्टी नाही.

झांग हुईके हा सर्वात जास्त व्रात्य मुलगा आहे. वर्गात काही चांगले विद्यार्थी आहेत. व्रात्य मुलेही मनाने चांगली आहेत. मात्र मुले सहजासहजी नवीन शिक्षिकेला स्वीकारायला तयार नाहीत. व्रात्य मुले व हट्टी शिक्षिका यांच्या भांडणात वर्गातील डुगडुगणारे टेबल पडते त्यावरचे खडूही.. खडूंवर पाय पडताच त्यांची जी काही अवस्था होते ती आधी मिंजीच्या लक्षातच येत नाही. आणि लक्षात आल्यावर तिच्या हातावर मुलांचे पाय पडत असताना ती जिवाच्या आकांताने खडू गोळा करते.

दुस-या दिवशी वर्गात परत दंगा होतो. आज कुरापती झांगने मिंगची डायरी पळवली आहे. आणि तो तिने कितीही नकार दिला तरी ती डायरी सगळ्या वर्गासमोर वाचतो आहे. आपली वॆयक्तिक डायरी वाचलेली कोणाला आवडेल ? आत्तापर्यंत लिहा हे एकच उत्तर देणारी मिंजी यावर निर्णय देते ’वाचा’
डायरीत कालच्या प्रसंगाचे वर्णन लिहिले आहे. खडू कसे तुटले ? आधीचे शिक्षक कसे खडू पुरवून वापरत. आपली शाळा किती गरीब आहे. शिक्षिका सगळ्यांना वठणीवर का आणत नाही ?

तिस-या दिवशी वेई मिंजीच्या लक्षात येते की तिचा उनाड विद्यार्थी वर्गातून गायब आहे. इतर मुलांकडून तिला कळते की तो झीमेई नावाच्या मुलीसोबत काम मिळवण्यासाठी शहरात गेला आहे. झांग हुइकेला वडिल नाहीत आणि आई फ़ार आजारी आहे. कुटुंबावर फ़ार कर्ज असल्याने हुईकेला ’असल्या’ शिक्षणापेक्षा कामातून मिळणारे पॆसे जास्त महत्वाचे आहेत. त्याची रोजगाराची गरज वगॆरे मिंजीच्या लक्षात येत नाही. तिच्या लक्षात आहे ती फ़क्त मास्तरांची धमकी.. ’एक सुध्दा कमी नको’ Not one less..

गावचा सरपंच हे सगळे झटकून देतो. आता शहरात जाऊन हुईकेला हुडकून आणण्याची जबाबदारी घ्यायला हवी. मिंजी ठरवते की तीच शहरात जाईल. शहरात जाणे तसे अवघड नव्हते. पण बसच्या तिकीटासाठी पॆसे तर लागणारच. आणि एक नाही तर तीन तिकीटांसाठी… जाण्याचे एकाचे आणि येताना दोघांचे. मिंजीकडे अंगावरचे कपडे व उरलेल्या खडूंपलीकडे काही नाही. शहरात जाण्याच्या
खर्चाचा अंदाज कोणालाच नसतो. एका विद्यार्थ्याने सांगितले की काही वर्षांपूर्वी तो आईसोबत शहरात गेला होता तेव्हा तीन युआन तिकीट होते. नऊ युआन मिळवण्यासाठी सर्व विद्यार्थी आपल्याकडे आहेत-नाहीत ते सर्व पॆसे शिक्षिकेकडे आनंदाने देतात. आता उरलेले पॆसे कुठून आणायचे या विषयावर सर्व वर्ग गंभीरपणे विचार करतो. त्यातल्या एकाला सुचते की बाजूच्या विटा बनवायच्या कारखान्यात मजुरी करावी. जशी मुले.. तशीच शिक्षिका.. सगळे उत्साहाने विटांच्या कारखान्यात जाऊन धडकतात आणि काही विचारपूस न करता विटा इकडून तिकडे उचलून ठेवतात. काही विटा पडतात.. काही तुटतात. कोलाह्ल ऎकून तेथील मॅनेजर येतो आणि या वानरसेनेची कामगिरी पाहून बुचकळ्यात पडतो. पण त्यांची समस्या ऎकल्यावर दया येऊन तो दहा युआन देतो.

आता मिंजीकडे बसभाड्यापेक्षा जास्त पॆसे जमा होतात. तिच्यातील शिक्षिका जागी होऊन विचार करते की सगळ्या चमूची तहान भागवायला हवी. ती सुध्दा विदेशी थंड पेयांनी, जे त्यांनी आजवर फ़क्त जाहिरातीतच पाहिले होते. पण लक्षात येते की मिंजीकडे असलेल्या पॆशातून फ़क्त दोनच टिन परवडणार होते. मग सगळी मुले आपापल्या वाट्याला आलेला एकेक घोट घेऊन तृप्त होतात.

आपल्या शिक्षिकेला सोडायला सगळी मुले बसस्थानकावर जातात. पॆसे मिळवण्याची सगळी खटपट ऎकीव गोष्टींवरुन व गणिताच्या अर्धवट ज्ञानावर केलेली असते. त्यामुळे बसस्थानकावर पोहोचल्यावर लक्षात येते की जवळ्च्या पॆशात तीन काय एकसुध्दा तिकिट परवडणार नाही. मग असे ठरते की मिंजीने विनातिकिट बसमध्ये चढायचे.

मुले विचार करतात की सगळे एकदम बसमध्ये चढले तर कंडक्टर त्यांच्या तिकीट नसलेल्या शिक्षिकेपर्यंत पोहोचणारच नाही. पण त्यांची ही युक्ती सफ़ल होत नाही. त्या सगळ्यांना तेथेच उतरवले जाते तर त्यांच्या शिक्षिकेला गावाबाहेर.. पण मिंजी आता अजिबात मागे फ़िरत नाही. ती चालत चालत शहराच्या दिशेने निघते.

मोठ्या शहराचा झगमगाट पाहून मिंजी घाबरत नाही. इकडे तिकडे विचारत ती झांग हुईकेच्या पत्त्यावर जाऊन पोहोचते. हुईके ज्या मुलीबरोबर झीमेईसोबत गावातून आलेला असतो, ती मिंजीला नवीन संकटात टाकते ; हुईके त्याच्या व्रात्य स्वभावामुळे रेल्वे स्टेशनवरच हरवला असे ती मिंजीला सांगते.

आता मिंजी आणि झीमेई तीन दिवसांपूर्वीच हरविलेल्या हुईकेला प्लॅटफ़ॉर्मवर शोधायला लागतात. मित्रपरिवारातू हरवल्यावर हुईके थोडाच प्लॅटफ़ॉर्मवर थांबणार ? तो बाहेर पडून शहरात भटकायला निघतो. भुकेने व्याकुळ होऊन तो एका हॉटेलमध्ये सामोसे, मिठाईकडे आशाळभूत नजरेने पाहत असतो. त्याच्या अशा फ़िरण्याने ग्राहक निघून जाऊन नयेत म्हणून त्या हॉटेलची मालकीण त्याला पोटभर खायला देते व छोटीमोठी कामेही सांगते.

इकडे स्टेशनवर एकट्या बसलेल्या मिंजीला एक स्त्री सुचवते की हुईके हरवल्याची बातमी एका कागदावर लिहून तो कागद स्टेशनात चिकटवला तर उपयोग होऊ शकेल. मिंजी आपल्याकडचे सर्व पॆसे खर्च करुन कागद, पेन व शाई आणते. रात्रभर जागून ती शंभरएक कागदांवार हुईके हरवल्याची बातमी लिहिते. स्टेशनवरचा एक प्रवासी ते पाहून पुटपुटतो की पाणी घालून पातळ केलेल्या शाईने लिहिलेला मजकूर कोण वाचणार आणि त्यात पत्ता तर लिहिलेलाच नाही. कोणाला मदत करावीशी वाटली तर तो/ती संपर्क कुठे साधणार ? थकल्या भागलेल्या आणि भुकेने व्याकुळ झालेल्या मिंजीला तर काहीच सुचेनासे होते. कोणीतरी योग्य मार्ग सुचविला तर तो ती अमलात आणू शकते. सल्ला द्यावा म्हणून ती त्या प्रवाशाच्या मागेच लागते. तिला टाळण्यासाठी तो टेलिव्हिजनकडे जायचा मार्ग सुचवितो.

आता बिचारी मिंजी येणा-या जाणा-यांना टेलिव्हिजन केंद्राचा पत्ता विचारायला लागते. एक खेडवळ मुलगी टेलिव्हिजन स्टुडिओच्या ऒफ़िसमध्ये पोहोचून करणार तरी काय ? कोणी तिचे म्हणणे कशाला ऎकेल ? मिंजीकडे ना जाहिरात द्यायला पॆसे आहेत ना शिफ़ारसपत्र, ना ती शिक्षिका असल्याचा दाखला. ती रिसेप्शनिस्ट च्या पुढे कोणापर्यंत पोहोचूच शकत नाही. रिसेप्शनिस्ट या ब्यादीला कंटाळून संचालकांना भेटायला सांगते. पण ऒफ़िसमध्ये आत जाऊन नाही तर गेट्च्याबाहेर उभे राहून.. आता चौकीदार ही तिला बाहेर घालवून देतो.

झाले.. मिंजी आता टेलिव्हिजन केंद्राच्या बाहेर येणा-या जाणा-यांना थांबवून विचारायला लागते की ते या केंद्राचे संचालक आहेत का ? चौकशी करण्यातून कोणी सुटू नये म्हणून ती सायकलवाल्यांचा लांबवर पाठलाग करुन हा प्रश्न विचारते. संध्याकाळ होते. रात्री गार वा-याने तिचे कागद उडून जातात व पहाटेच्या काळोखात सफ़ाईसाठी आलेले कामगार ते कागद कचरा म्हणून घेऊन जातात.

मिंजी थंडीत गारठून झोपलेली असते. सकाळ झाल्या झाल्या जवळच्या नळावर तोंड धुवून ती परत केंद्राच्या आयुक्तांना शोधायची मोहीम चालू ठेवते.

दुपारनंतर संचालकांना कोणीतरी सांगते की एक गरीब, ग्रामीण मुलगी दीड दिवस त्यांना शोधते आहे. ते खिडकीतून बाहेर डोकावतात. एक दुबळी, लाचार मुलगी येणा-या जाणा-यांमागे चौकशी करताना दिसते. ते हॆराण होतात. नियमावर बोट ठेवून काम करणारे लोक माणुसकी पूर्णपणे विसरुन गेले होते की काय ? त्यांना आधीच हे कोणी का सांगितले नाही म्हणून रागावतात देखील. आता संचालक स्वत: जाऊन मिंजीला घेऊन येतात.

तिला तर परमेश्वर भेटल्यासारखा आनंद होतो. एका विशेष कार्यक्रमाद्वारे कॅमे-याच्या लेन्समध्ये बघत हुईकेल परत येण्याचे आवाहन करताना तिला रडू फ़ुटते. तिचे आवाहन दर्शकांच्या व हॉटेलमध्ये भांडी घासणा-या हुईकेच्या मनाला स्पर्शून जाते.

तर वाचकहो, गोष्ट तशी बरीच मोठी आहे. पण थोडक्यात सांगायचे तर शेवटी शिक्षिकेला आपला हरवलेला विद्यार्थी परत मिळतो. इतकेच नव्हे तर टेलिव्हिजन वरील कार्यक्रमामुळे शाळेसाठी भेटवस्तू, फ़र्निचर व पॆसेसुध्दा मिळतात. फ़ुलांनी मढलेल्या गाडयांच्या काफ़िल्यात मिंजी व हुईके टेलिव्हिजनच्या लोकांसोबत गावी परत येतत. तेव्हा सगळे आश्चर्यचकित होतात. त्यांच्या स्वागतासाठी सर्वात पुढे असतो तो गावचा सरपंच.. ज्याने शिक्षिकेला शहरात जायला मनाई केली होती. मिंजीच्या ऎवजी तो सरपंच गावात गेला असतात तर जरी हुईके सापडला असता तरी त्याचे मन पालटून तो परत आला असता का ? त्याला भेटवस्तू व आर्थिक मदत मिळाली असती का ?

हा प्रवास तर मिंजीनेच करायला हवा होता. यामुळेच तिच्या हट्टी स्वभावाचे रुपांतर आपले ध्येय ठामपणे साध्य करणा-या स्वभावात होणार होते. विद्यार्थ्यांचे या मुलीशी मनाने नाते आधीच जुळले होते. पण ती त्यांची शिक्षिका बनायला या सर्व घटनांमुळे पात्र होते. परिस्थितीमुळे करावी लागलेली नोकरी तिला आयुष्यभराचे धडे देऊन जाते. भले तिला दहा युआन मिळणार होते पण आव्हानांबरोबरच तिचे ध्येय ठरत जाते. महिन्याभरात आपल्या कम्युनिटीत परतलेली मिंजी आता एक अल्लड तरूणी रहात नाही.

Not one less.. हा चिनी सिनेमा सत्यघटनेवर आधारित असल्याचा दावा करत नाही. पण प्रत्यक्ष असे वेळ पडल्यास करण्याची प्रेरणा नक्की देतो. चमकदार पोशाख. गाजलेले अभिनेते याऎवजी धुळीने भरलेली रखरखीत दृश्ये असूनही हा सिनेमा आपल्याला खुर्चीला खिळवून ठेवतो. याचे निर्देशक झांग यिमू यांना Raise the red lantern या सिनेमासाठी देखील नावाजले गेले आहे.


हा सिनेमा बघितल्यावर एका कवितेची आठवण आली. जी पद्मा गोळे यांची आहे.

पांढरे निशाण उभारण्याची,
घाई करु नकोस,
मूठभर हृदया,
प्रयत्न कर,
तगण्याचा, तरण्याचा,
अवकाश भोवंडून टाकणा-या,
या प्रलंयकारी वादळाचाही,
एक अंत आहे,
काळाच्या त्या निर्णायक बिंदूपर्यंत,
लढत राहा,
तुझ्या नाजूक असित्वानिशी,
वादळे यासाठीच वापरायची असतात,
आपण काय आहोत,
ते तपासण्यासाठी नव्हे,
काय होऊ शकतो,
हे आजमावण्यासाठी.

Monday, December 8, 2008

झिहाल- ए-मुस्किन

झिहाल- ए-मुस्किन मुकों बा रंजिश, बहाल-ए-हिजरा बेचारा दिल हॆ
सुनायी देती हॆ जिसकी धडकन, तुम्हारा दिल या हमारा दिल हॆ

या गाण्यातील पहिल्या ओळीबाबत फ़ार कुतूहल होते. कारण या गाण्याचे गीतकार आहेत गुलजार.. पण पहिली ओळ गुलजारच्या typical शॆलीतली वाटत नव्हती.. व कळत तर अजिबातच नव्हती.

तर माहिती मिळाली ती अशी की ही ओळ सूफ़ी कवी आमिर खुस्त्रो यांच्या एका रचनेवरुन घेतली आहे.

झिहाल- ए-मुस्किन मुकों-बा रंजिश, बहाल-ए-हिजरा बेचारा दिल हॆ
याचा अर्थ आहे..
झिहाल = लक्ष देणे.
मिस्किन = गरीब.
मुकों = नकार
बा-रंजिश = दुष्ट हेतू, शत्रुत्व
बहाल = ताजा.
हिजरा = विरह

याचा एकूण अर्थ : बिचा-या त्या हृदयाकडे लक्ष दे आणि त्याच्याकडे शत्रुत्वाने पाहू नकोस. ते विरहाच्या जखमांनी विध्द झालेले आहे.

दर्द जब तेरी अता हॆ तो गिला किससे करे
हिज्र जब तूने दिया हॆ तो मिला किससे करे

या आशा भोसले यांनी गायलेल्या गझल मध्ये ही विरहाचे वर्णन आहे. सूफ़ी संतांच्या रचनांमध्ये प्रेम व अल्ला या दोघांनाही ब-याचशा रचना लागू पडतात. यात एक अर्थ अल्लापासून लांब गेलेला (त्याचा विरह झालेला) असाही असू शकतो.

Sunday, December 7, 2008

वाटा..


रस्ता हे प्रतीक घेऊन आयुष्याबद्दल अनेकांनी लिहिलं आहे. नेहमी रोज जाणवते ते म्हणजे…

तसा सरळही नसतो रस्ता
नशीबही नसते सरळ तसे
कळतही नाही ऋतूसारखे
बदलत जाती दिवस कसे..

गुलजार यांच्या कवितेत लिहिल्याप्रमाणे ..( येथे ’गुलजार बोलतो त्याची कविता होते’ या वाक्याची अपरिहार्य आठवण येते.. ) आपण एका कोणत्या तरी रस्त्यावरुन कायम चालत असतो.

सहरा की तरफ़ जाकर, इक राह बगूलों में खो जाती हॆ चकराकर
रुक रुकके झिझकती सी, इक मौत की ठंडी वादी में उतरती हॆ
इक राह उधडती सी, छिलती हुई काटों से, जंगल से गुजरती हॆ
इक दौड के जाती हॆ और कुदके गुजरती हॆ, अनजानी खलाओं में

उस मोड पे बॆठा हूं, जिस मोड से जाती हॆ हर इक तरफ़ राहें………

.. ’अनजानी खलाओं में’ जाणा-या वाटेवरुन चालताना

चलते रहते हॆ के चलना हॆ मुसाफ़िर का नसीब
किसको मालूम किधर के हॆ, कहां के हम हे ?

असेच कायम वाटत रहातं.

अनेकदा एकटेपणाची जाणीव होते. कित्येकदा तर एका प्रखर सत्याची जाणीव घेऊन दिवस उजाडतो. अत्युच्च आनंदाच्या किंवा अतिशय दु:खाच्या क्षणी,, खूप समर्थ आणि खूप असहाय्य वाटणा-या क्षणांत , तुमच्या विचारांत, तुमच्या कृतीत, स्वप्नात, जन्मताना, जगताना आणि मरताना आपण एकटे असतो. परत एकदा गुलजारच्या शब्दात..

किस कदर सीधा, सहल साफ़ हॆ रस्ता देखो
न किसी शाख का साया हॆ न दीवार की टेक
न किसी आंख की आहट
न किसी चेहरे का शोर
दूर तक कोई नही, कोई नही कोई नही

किस कदर सीधा, सहल साफ़ हॆ रस्ता देखो..

रोजच्या धावपळीत, नातेवाईक, सहकारी, यांच्याशी वागताना, ट्रीपला गेल्यावर, कॉफ़ीची order देऊन चहा आल्यावर, खूप आनंदाची बातमी घेऊन घरी गेल्यावर शेजारचा तरूण मुलगा गेल्याचे कळल्यावर एकच कळते की..

किसी के वास्ते राहॆ कहा बदलती हॆ
तुम अपने आप को खुद ही बदल सको तो चलो

यहां किसी को कोई रास्ता नही देता
मुझे गिराकर अगर तुम संभल सको तो चलो

व्यंकटेश माडगूळकर यांनी इतक्या नेटक्या शब्दात एका रस्त्याचे शब्दचित्र काढले आहे.

दोन्ही बाजूला दाट जंगल आणि मधूनच जाणारा हा तांबडा रस्ता म्हणजे जलरंगातले एक सुंदर निसर्गचित्र होते. इथल्या हवेला झाडांच्या मोहोराचा, मोहाच्या फ़ुलांचा, गवताचा मंद सुवास असे आणि नाना पाखरांच्या सकाळच्या कूजनाचा नाद असे. बाकी सर्वत्र शांत, प्रसन्न. भल्या सकाळी उठून एखादे ताजे वृत्तपत्र वाचावे तसा हा रस्ता मी वाचत असे. मोठमोठी शीर्षके असत. काल रात्रीपासून भल्या पहाटेपर्यंत घडलेल्या घटनांचा वृतांत इथे वाचायला मिळे.”


त्यापुढे ते म्हणतात..

तो रस्ता मी ताज्या वर्तमान पत्रासारखा वाचला आणि वाटा धुंडताना रहस्यकथेच्या पानातून वावरलो. सुतानं स्वर्गाला कसे जाता येतं ते ह्या वाटांनी मला दाखविले. काहीही मिळवायचं म्हणजे वाटा या तुडवाव्या लागतातच.”

शेवटी उरते ते एकच…………..

गम हो के खुशी दोनों कुछ देर के साथी हॆ
फ़िर रस्ता ही रस्ता हॆ हंसना हॆ ना रोना हॆ

पाऊस - अमेरिकेतला


प्रिय सरो,

समजलं,

आई अत्यवस्थ आहे,

पण इथे पाऊस लागलाय,

पाऊस आमेरिकेतला

तुला काय समजणार म्हणा,

मी इथून निघणार कसा ?

पण आईच्या म्रुत्यूची व्हिडीओ कॅसेट नक्की पाठव,

शेवटच्या आचक्यापासून क्रियाकर्मापर्यंत सगळं अगदी व्यवस्थित नोंदव,

इथल्या मित्रांना अंत्यविधी आवडतो,

भारतीय लग्न, लग्नाची पार्टि, मधुचंद्र,घटस्फ़ोट,सती,असलं सगळं पाहून झालंय,

श्वास थांबल्यानंतरचं क्रियाकर्म जसं प्रेताला आंघॊळ घालणं,कोरे कपडे चढविणं, तोंडात भाताचा गोळा ठेवणं, अग्नी देणं, मडकं फ़ोडणं,

असलं अजून नाही पाहिलं म्हणून पहायचंय,

पण ब्लॅक आणि व्हाईट आणि रंगीत अशा दोन्ही कसेट वेगवेगळ्या काढा,

ब्लॅक आणि व्हाईट आवड्ते मर्लीनला,

जॅक्लीनच्या मते कलरशिवाय 'चिता-फ़िल्म' ला काय मजा,

व्हिडीओवाला आधीच बुक कर

वेळेवर व्हिडीओ मिळाला नाही,

किंवा आईनं वेळ दिला नाही,

कुठलीच सबब ऎकणार नाही,हवं तर चांगली कॅसेट मी इथून पाठवितो,

पाऊस नसता तर मी सुध्दा आलो असतो,

कॅसेट उत्तम बनली पाहिजे खूपजणांना पाहायची इच्छा आहे..

'दि लास्ट मोमेंट्स आफ़ इंडियन मदर',हेच टायटल ठीक वाटेल नाही तर लग्नाची कॅसेट वाटेल,

दुखवट्याला आलेल्यांच्या चेह-यावरुन कॅमेरा फ़िरव,

ख्रिसमसला खूप मित्र जमतील कॅसेट बघतील॥

त्याआधी पाठव,

कॅसेट मिळाल्यावर बाकीच्या गोष्टी आईला जमवून घ्यायला सांग,

ख्रिसमसच्या आधी,

तिलासुध्दा दे खबर पावसाची,

घे काळजी

तुझा ,अमेरिकन दादा.


-अय्यप्पा पणीकर




Wednesday, December 3, 2008

हलका हलका उंस हुआ…

’दिल से’ हा सिनेमा प्रथम बघताना ’सतरंगी रे’ या गाण्याने फ़ार लक्ष वेधले गेले. त्यातल्या उंस (हलके हलके उंस हुआ) या शब्दाबद्द्ल कुतूहल वाढल्याने जरा नेटवरुन माहिती घेतली तर जे काय हाती लागले ते मांडते आहे..

यातले सात रंग म्हणजे प्रेमाच्या सात पाय-या (टप्पे म्हणाले तर त्यात सरळ रेषा येते पण चढत जाणे येत नाही.. असो) आहेत ज्या या सिनेमात रंगविल्या आहेत.

१. हब = आकर्षण
२. उंस = ओळख
३. इष्क = प्रेम
४. अकीदत = आदर
५. इबादत = पूजा
६. जुनून = भारुन जाणे, झपाटणे (जुनून चा एक अर्थ उठाव असा आहे.. जो शशीकपूरच्या जुनून चा आहे)
७. मौत

आता ते गाणे

तू ही तू तू ही तू सतरंगी रे, तू ही तू तू ही तू मनरंगी रे
दिल का साया हमसाया, सतरंगी रे मनरंगी रे
कोई नूर हॆ तू क्यूं दूर हॆ,तू, जब पास हॆ तू एहसास हॆ तूकोई ख्वाब या परछाई हॆ, सतरंगी रे..

इस बार बता मुंहजोर हवा ठहरेगी कहां

इश्क पर जोर नहीं हॆ यह वो आतिश गालिब
जो लगाये ना लगे और बुझाये ना बने

आंखोंने कुछ ऎसे छुआ,
हलका हलका उंस हुआ
दिल को यह महसूस हुआ

तू ही तू तू ही तू जीने की सारी खुशबू, तू ही तू तू ही तू आरजू आरजू
तेरी जिस्म को आंच को छुते ही मेरी सांस सुलगने लगती हॆ
मुझे इष्क दिलासे देता हॆ मेरे दर्द बिलखने लगते हॆ
छुती हॆ मुझे सरगोशी से, आंखों मे घुली खामोशी से
मॆ फ़र्श पे सजदे करता हूं कुछ होश में कुछ बेहोशी से

तेरी राहों मे उलझा उलझा हूं, तेरी बाहोंमें उलझा उलझा
सुलझाने दे होश मुझे तेरी चाहों मे उलझा हूं

मेरी जीना जुनून मेरा मरना जुनून अब इसके सिवा ना कोई सुकून
मुझे मौत की गोद में सोने दे , मेरी रुह में जिस्म डुबोने दे

कुसुमाग्रज म्हणतात तसे

वादळवेडी विस्मयकर ही दीर्घकुंतली जात..

कधी वणव्याच्या मुकुटावरती तुरा होऊनी फ़िरे,
देवघरातील होते केव्हा मंद शांत फ़ुलवात..
कधी पतीस्तव सती होऊनी सरणावरती चढे,
कधी जारास्तव विश्व जाळूनी घुसते वनवासात..
तीर्थरुप ही कधी वाहते अमल जान्हवीपरी,
कधी खिडकीतूनी मांसल हिरव्या नजरेची बरसात..
नागिण होऊनी कुठे टाकते कालकुटाच्या चुळा,
कुठे प्रकटतो हिच्याच देही इश्वरतेचा हात..
उषा होऊनी कधी करितसे प्रतिभेची लावणी,
कधी शालूसम नेसून बसते ही अवसेची रात..
हसणे रुसणे कधी दावते दवबिंदूची कुळी,
कधी खडकावर कठोरतेने करी लीलया मात..
ही रसरंगित करी सुगंधित जीवन म्हणती जया,
हीच ठेविते फ़ुटकळ मरणे किनखापी बटव्यात ..

याचा प्रत्यय या सिनेमात वारंवार येतो.

अर्थात शेवटी प्रेमाबद्दल शेवटचा शब्द म्हणजे कुसुमाग्रजांचीच एक कविता...

प्रेमयोग

प्रेम कुणावर करावं ?
कुणावरही करावं

प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं,
कुब्जेच्या विद्रुप कुबडावर करावं,
भीष्मद्रोणांच्या थकलेल्या तीर्थरुप चरणांवर करावं,
दुर्योधन-कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं।
प्रेम कुणावरही करावं।

प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं,
अर्जुन नावाच्या राजेन्द्रावर करावं,
बासरीतून पाझरणा-यासप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं,
यमुनेचा डोह जहरुन टाकणा-या कालियाच्या फण्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं

प्रेम
रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं,
वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं,
गाईच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं,
मोराच्या पिसा-यातीलअद् भुत लावण्यावर करावं,
प्रेम काळजाच्या नात्यावर करावं,प्रेम खड्गाच्या पात्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं

प्रेम
गोपींच्या मादक लीलांवर करावं,
पेंद्याच्या बोबडया बोलावर करावं,
यशोदेच्या दुधावर,
देवकीच्या आसवांवर,
प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं
कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं,
ज्याला तारायचं,
त्याच्यावर तर करावंच,
पण ज्याला मारायचं,
त्याच्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं

प्रेम
योगावर करावं,
भोगावर करावं,
आणि त्याहुनही अधिक,
त्यागावर करावं

प्रेम
चारी पुरुषार्थांची झिंग देणा-याजीवनाच्या द्रवावर करावं,
आणि पारध्याच्या बाणानं घायाळ हो ऊनअरण्यात एकाकी पडणा-यास्वतःच्या शवावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं
कारण
प्रेम आहे
माणसाच्यासंस्कॄतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
आणि
भविष्यकालातील
त्याच्या अभ्युदयाची आशा
एकमेव ..... !

Tuesday, December 2, 2008

mumbai terrorist attack यावरुन सुचलेले काही (बाही) विचार

अ. IT मधील बंदा - मनोगत

१. गाडी servicing ला द्यायची आहे.
२. CA कडे जायचे आहे.. income tax returns राहिलेच आहेत अजून
३. मुलीच्या शाळेत मीटींग आहे.
४. बायकोला गाण्याच्या क्लासला सोडायचे आहे..
५. मॉल मध्ये जाऊन नवीन कपडे घ्यायला हवेत. उद्या presentation आहे.
६. च्यायला.. रस्ते महानगरपालिकेने किती वाईट बांधलेत. भिकारी मुले किती मध्ये मध्ये येतात.
७. सालं.. india मधे काही life नाही..
८. नवीन मॅक्डोनाल्ड try करायलाच हवं.. मुलीच्या शाळेत सगळे तिला ’इतकंही माहिती नाही का’ म्हणून चिडवतात रे..
९. सवाई गंधर्व ला जायला हवं.. मागच्यावर्षी माझा junior गेला होता ना.. फ़ार भाव खात होता..
१०. चांगला मुंबईला hayat मध्ये meet ला जायचा chance होता.. या अतिरेक्यांनी ’माझ्या’ career ची वाट लावली.
११. christmas च्या सुट्टीत फ़िरायला जावे तर त्या xyz resort मध्ये swimming pool नाही साधा..
१२. हेमंत करकरे गेले त्याची शोकसभा.. अरे वेळ नाही बाबा.. जागतिक मंदी आलीय.. कुठे गुंतवणूक करावी याची मीटींग आहे consultant सोबत.. मी वेळ मिळाला तर e-condolances पाठवितो... वाचून दाखव.

ब. मध्यमवयीन गृहिणी - मनोगत

१. आपल्या घराजवळ मुसलमान वस्ती जरा जास्तच वाढलीय..
२. मिठाईवाला मुसलमान आहे.. त्याच्याकडून sweets घ्यायला नको वाटते.. (काल घेतले सामोसे.. काय करणार.. उन्हाचे कुठे लांब जाणार.. बरं quality चांगली असते मेल्याची !! )
३. गिरणी एक बोहरी बाई चालविते.. तिच्याकडून दळण आणणे नको वाटते.. (जवळपास दुसरी गिरणी नाही.. आपण स्वत: आणले नाही तर तो ज्वारीवर गहू घालतो..)
४. जागतिक शांती वरची पुस्तके.. नको बाई.. मला आपल्या कुसुम अभ्यंकरांच्या कादंब-याच ब-या वाटतात.. छोट्या छोट्या कथांचे कथासंग्रह वाचते ना मी.
५. कालच बाईला शिळे झाले म्हणून चांगले पाव किलो पेढे दिले. या मोलकरणींना कितीही द्या.. कौतुक नाही. त्या जोशांकडचे काम मेली मन लावून करते.. मी इतके सगळे देऊन आपलं काम असं.. नशीबच वाईट..
६. वृध्दाश्रमात नको वाटते बाई.. सारखे त्या म्हाता-या लोकांचे हाल पाहून डोळ्यात पाणी येते.. थांबायला मात्र नको.. कसले कसले रोग असतात त्यांना..
७. हेमंत करकरे.. किती देखणे होते ना.. अकाली गेले अगदी.. त्यांच्या बाहिणीचं पत्र वाचलं का.. डोळ्यात पाणी आलं अगदी.. शोकसभा..असले काही करायला वेळ कुठे आहे ? मधुरांगणचे कार्यक्रम बुडतात..
आणि भिशी असते ना माझी.. साडी आणायला हवी नवीन.. सगळ्या माझ्या साड्या बघितल्या आहेत आता group मध्ये.

क. नोकरी करणारी स्त्री / तरुणी.. - मनोगत

१. terrorist attack मुंबईत झालेत म्हणून एक दिवस सुट्टी द्या असे बॉसला म्हणले तर तो म्हणे मुंबईत attack तुमचा काय संबंध.. या शाल्मलीच्या शाळेपायी कुठे सिनेमा बघणे होत नाही. जरा सुट्टि मिळाली असती तर ’दोस्ताना’ टाकला असता..
२. शाल्मली म्हणत होती तर साधे रव्याचे लाडू करुन देता येऊ नयेत का सासूबाईंना ? तिला सांभाळतात त्याचे कौतुक आहे ना ? आम्ही नोकरी करुन घर सांभाळतो तर सारखे ’घरात फ़ार काम’ असा टिमका चालू असतो. आता वेगळे राहावे म्हणले तरी शाल्मलीचा प्रश्न आहेच.. सहन करणे भाग आहे..
३. ऒफ़िसमधे - सर आज लवकर जाऊ का ?
१. मुलीचा वाढदिवस आहे.
२. xyz डोहाळजेवण आहे.
३. गाडीत पेट्रोल भरायचे आहे.
४. तुळ्शीबागेत जायचे आहे. एरवी वेळ नसतो.
५. ऒफ़िसमधील एक लग्न आहे.. तासभर जाऊन येते.
६. लग्नाचा वाढदिवस काल झाला ना.. काल सुट्टि झाली.. पण आज त्याची पार्टी एक मॆत्रीण मागतेय.. लवकर येते जेवून.. चायनीज मध्येच जाणार आहोत..
४. हेमंत करकरे.. ATS , NSG पेपर बिपर वाचायला वेळ नाही. ते हल्ले पाहून मात्र पोटात तुटले.. ते कमांडोज helicopter मधून कित्ती छान उतरत होते ना.. अभिषेक बच्चन त्या फ़लाण्या सिनेमात अगदी अस्साच उतरतो..
५.विलासराव देशमुख.. एवढं काय झालं रितेशला नेलं म्हणून..ताज पाहायाचा असेल त्याला.. त्याच्या career चा प्रश्न आहेच.
६.शोकसभा.. नको बाई.. घरी दारी सारखं tension नको वाटतं.. त्यापेक्षा ते नवीन mexican food वालं restaurant try करु असं म्हट्लं याला..

ड. पत्रकार - मनोगत

१. मुंबईत स्फ़ोट झाले त्या हॉटेल शेजारी माझं ओफ़िस.. जरा रात्रीच्या duty वर असताना चक्कर मारायला गेलो तर .. रस्ता cross करुन येता येता गोळीबाराचा आवाज.. सुदॆव म्हणून जीव वाचला..
२. हा अनुभव आता सगळ्यांना सांगायला नको.. हा अणि नंतरचा रेल्वे स्टेशन वरचा byte मिळाला त्याचे अनुभव एकत्र करुन एक मस्त story बनवायला हवी.
३. एवढी वर्षं या पत्रकारितेत काढून एक पुस्तक नाही माझं.. आता या अनुभवांवर एखादं पुस्तक छापतो.. त्याचा सिनेमा झाला तर फ़ारच बरं..
४. माझ्या जिवाची काळजी म्हणून एक फ़ोन नाही साधा.. आता मीच सगळ्या मित्रमॆत्रीणींना मेसेज टाकतो.. कोण बरं ती हां.. शिल्पा.. काल zee 24 taas वर होती.. तिला टाकायला पाहिजे मेसेज.. zee वर चान्स मिळाला तर बरे..
५.हेमंत करकरे शोकसभेला जावे लागणार.. .. फ़िल्म फ़ेस्टिव्हलचे coverage आवडले असते पण सध्या हाच विषय hot आहे.. त्या xyz इंग्रजी वृत्तपपत्रात चान्स मिळाला तर बघायचेय.. मराठी पत्रकारितेत राम नाही.

ई. एक प्रोफ़ेसर.. - मनोगत

१. आजकालचे हे तरुण अतिरेकी.. यांना जीवनविषयक मूल्ये वगॆरे काही कळत नाही. धर्म म्हणजे काय हे तरी कळते का यांना? निघालेत धर्माच्या नावाने गोळीबार करत..
२. नाशिकला त्या विद्यापीठात जायचे होते काल.. १० पुस्तके syllabus म्हणून छापली गेली तर घराचा हप्ता भरणे सोपे होईल. या अतिरेकी हल्ल्याने सगळेच डळमळीत झालेय.
३. कॉलेजमध्ये principle सोबत बोलून विद्यार्थ्यांसाठी अतिरेकी आणि दहशतवाद यावर चर्चासत्र आयोजित करायला हवे. मी असे विधायक कार्य करतो त्यामुळे त्यांचा लाडका आहे. इतर प्रोफ़ेसर जळतात माझ्यावर.
४. शोकसभेला जायला नक्कीच आवडले असते.. पण बायको मागे लागलीय.. दोन दिवस गाडी काढून ट्रीपला जाऊयात.. तिचाही संसारात विचार करायला हवा.. मी स्त्रियांना समानतेने वागवतो..