Wednesday, December 3, 2008

हलका हलका उंस हुआ…

’दिल से’ हा सिनेमा प्रथम बघताना ’सतरंगी रे’ या गाण्याने फ़ार लक्ष वेधले गेले. त्यातल्या उंस (हलके हलके उंस हुआ) या शब्दाबद्द्ल कुतूहल वाढल्याने जरा नेटवरुन माहिती घेतली तर जे काय हाती लागले ते मांडते आहे..

यातले सात रंग म्हणजे प्रेमाच्या सात पाय-या (टप्पे म्हणाले तर त्यात सरळ रेषा येते पण चढत जाणे येत नाही.. असो) आहेत ज्या या सिनेमात रंगविल्या आहेत.

१. हब = आकर्षण
२. उंस = ओळख
३. इष्क = प्रेम
४. अकीदत = आदर
५. इबादत = पूजा
६. जुनून = भारुन जाणे, झपाटणे (जुनून चा एक अर्थ उठाव असा आहे.. जो शशीकपूरच्या जुनून चा आहे)
७. मौत

आता ते गाणे

तू ही तू तू ही तू सतरंगी रे, तू ही तू तू ही तू मनरंगी रे
दिल का साया हमसाया, सतरंगी रे मनरंगी रे
कोई नूर हॆ तू क्यूं दूर हॆ,तू, जब पास हॆ तू एहसास हॆ तूकोई ख्वाब या परछाई हॆ, सतरंगी रे..

इस बार बता मुंहजोर हवा ठहरेगी कहां

इश्क पर जोर नहीं हॆ यह वो आतिश गालिब
जो लगाये ना लगे और बुझाये ना बने

आंखोंने कुछ ऎसे छुआ,
हलका हलका उंस हुआ
दिल को यह महसूस हुआ

तू ही तू तू ही तू जीने की सारी खुशबू, तू ही तू तू ही तू आरजू आरजू
तेरी जिस्म को आंच को छुते ही मेरी सांस सुलगने लगती हॆ
मुझे इष्क दिलासे देता हॆ मेरे दर्द बिलखने लगते हॆ
छुती हॆ मुझे सरगोशी से, आंखों मे घुली खामोशी से
मॆ फ़र्श पे सजदे करता हूं कुछ होश में कुछ बेहोशी से

तेरी राहों मे उलझा उलझा हूं, तेरी बाहोंमें उलझा उलझा
सुलझाने दे होश मुझे तेरी चाहों मे उलझा हूं

मेरी जीना जुनून मेरा मरना जुनून अब इसके सिवा ना कोई सुकून
मुझे मौत की गोद में सोने दे , मेरी रुह में जिस्म डुबोने दे

कुसुमाग्रज म्हणतात तसे

वादळवेडी विस्मयकर ही दीर्घकुंतली जात..

कधी वणव्याच्या मुकुटावरती तुरा होऊनी फ़िरे,
देवघरातील होते केव्हा मंद शांत फ़ुलवात..
कधी पतीस्तव सती होऊनी सरणावरती चढे,
कधी जारास्तव विश्व जाळूनी घुसते वनवासात..
तीर्थरुप ही कधी वाहते अमल जान्हवीपरी,
कधी खिडकीतूनी मांसल हिरव्या नजरेची बरसात..
नागिण होऊनी कुठे टाकते कालकुटाच्या चुळा,
कुठे प्रकटतो हिच्याच देही इश्वरतेचा हात..
उषा होऊनी कधी करितसे प्रतिभेची लावणी,
कधी शालूसम नेसून बसते ही अवसेची रात..
हसणे रुसणे कधी दावते दवबिंदूची कुळी,
कधी खडकावर कठोरतेने करी लीलया मात..
ही रसरंगित करी सुगंधित जीवन म्हणती जया,
हीच ठेविते फ़ुटकळ मरणे किनखापी बटव्यात ..

याचा प्रत्यय या सिनेमात वारंवार येतो.

अर्थात शेवटी प्रेमाबद्दल शेवटचा शब्द म्हणजे कुसुमाग्रजांचीच एक कविता...

प्रेमयोग

प्रेम कुणावर करावं ?
कुणावरही करावं

प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं,
कुब्जेच्या विद्रुप कुबडावर करावं,
भीष्मद्रोणांच्या थकलेल्या तीर्थरुप चरणांवर करावं,
दुर्योधन-कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं।
प्रेम कुणावरही करावं।

प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं,
अर्जुन नावाच्या राजेन्द्रावर करावं,
बासरीतून पाझरणा-यासप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं,
यमुनेचा डोह जहरुन टाकणा-या कालियाच्या फण्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं

प्रेम
रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं,
वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं,
गाईच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं,
मोराच्या पिसा-यातीलअद् भुत लावण्यावर करावं,
प्रेम काळजाच्या नात्यावर करावं,प्रेम खड्गाच्या पात्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं

प्रेम
गोपींच्या मादक लीलांवर करावं,
पेंद्याच्या बोबडया बोलावर करावं,
यशोदेच्या दुधावर,
देवकीच्या आसवांवर,
प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं
कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं,
ज्याला तारायचं,
त्याच्यावर तर करावंच,
पण ज्याला मारायचं,
त्याच्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं

प्रेम
योगावर करावं,
भोगावर करावं,
आणि त्याहुनही अधिक,
त्यागावर करावं

प्रेम
चारी पुरुषार्थांची झिंग देणा-याजीवनाच्या द्रवावर करावं,
आणि पारध्याच्या बाणानं घायाळ हो ऊनअरण्यात एकाकी पडणा-यास्वतःच्या शवावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं
कारण
प्रेम आहे
माणसाच्यासंस्कॄतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
आणि
भविष्यकालातील
त्याच्या अभ्युदयाची आशा
एकमेव ..... !

4 comments:

HAREKRISHNAJI said...

इश्क से तबीयत ने जीस्त का मजा पाया
दर्द की दवा पाई दर्दे बे-दवा पाया

किंवा

इश्क मे गैर-ते-जज्बबात ने रोने ना दिया
वर्ना क्या बात थी किस बात ने रोने ना दिया!
आप कहते थे की रोने से बदलेंगेना नशीब
उम्र भर आपकी इस बात ने रोने ना दिया !
रोनेवालोंसे कहो उनका भी रोना रोले
जीन को मजबुरी-ए-हालात न ने रोने ना दीया !
तुझे मीलकर हमे रोना था बहुत ही रोना था
तंगी-ए-वक्ते-ए-मुलाखात ने रोने नादिया !
एक दो रोज का सदमा होतो रो ले "फाकीर"
हमको हररोज के सदमात ने रोने ना दिया !
- सुदर्शन फाकीर

आणि मुहब्ब्त म्हणजे निराशा देखील

ऐ मुहब्ब्त तेरे अंजाम पे रोना आया
जाने क्यु आज ते नाम पे रोना आया !
यु तो हर शाम उम्मीदोमे गुजरही जाती
आज कुछ बात है जो शाम पे रोना आया !
कभी तकदिरका मातम ,कभी दुनीया गीला
मंझीले-इश्क मे हर गाम पे रोना आया!
जब हुवा जीक्र जमाने मे मुहब्ब्त का "शकील"
मुझको अपने दिले-ना-काम पे रोना आया !

किंवा

मै शकील उनका हो कर भी न पा सका हुं उनको
मेरी तरह दुनीयामे कोई जीतकर भी न हारे !!

HAREKRISHNAJI said...

मौत-

जीस्तसे तंग हो जीते क्यु हो "दाग"
जान प्यारी भी नही और जानेसे जाते भी नही

Nitin Kulkarni.... said...

khup abhyas karates... mast.. great mejawani milate wachatana....

आल्हाद said...

unsa hua chya reference baddal dhanyuu ...
te gaana chhanach aahe pana aata shaabdiik arthane "kalalyane" aankhi bara vatla ..
too good!!