Friday, November 20, 2009

This world's a fiction and is made up of contradiction




जमाना बदल रहा हॆ….

१. कमीने : प्रियांका व शाहिद.. एका camp साठी गेलेले.. रात्री तो गडबडीत condom शोधतो आहे.. तिला वेळ नाही.. ती सांगते मला home science माहिती आहे.. safe व unsafe दिवस कळतात मला…यात त्यांचे लग्न झालेले नाही हाही एक मुद्दा आहे..
माझ्या एका वयाने जरा senior मित्राला फ़ोनवर हा dialogue या चित्रपटात आहे असे सांगितले तर त्याचा अर्थातच विश्वास बसला नाही..
२. wake up sid :
a. मी कलकत्त्याहून मुंबईला आले ते स्वत:चे घर असावे, स्वत:चे पॆसे मिळवावेत या हेतूने.. I want to become independent.. असे कोंकणा सेन (चित्रपटात आयेषा).. सांगते.
केवळ लग्न होऊनच मुली घर सोडतात या आपल्या समाजातील समजुतीला छेद देणारे हा संवाद..

b. याच चित्रपटात रणबीर कपूर - सिध्दार्थ – सिद घर सोडतो व चक्क आयेषा कडे येऊन विचारतो.. मी तुझ्या घरात राहू शकतो का ?
आसरा मागायचा स्त्रीने व द्यायचा पुरुषाने या अजून एका समजुतीला छेद देणारा हा संवाद..

३. सकाळ वर्तमानपत्र : दि. २०/११/२००९ पुरूषांना पाककलेचे धडे देणा-या मेघा गोखले यांच्यावरचा लेख.. त्यांनी जितक्या पुरूषांना ही कला शिकवली आहे ते सर्वजण आपापल्या किचनमध्ये त्याचा वापर करतात.. असे एक वाक्य आवर्जून लिहिले होते..
यावर विशेष काही लिहावं याची गरज नाही.. इतका तो लेख बोलका आहे..


क्या जमाना सचमुच बदल रहा हॆ ?

१. ओळखीची एक काम करणारी मुलगी. भरपूर खर्च करुन आईवडिलांनी लग्न करुन दिलेले… सासू रोजच्या लागणा-या (साबण वगॆरे) गोष्टी कपाटात ठेवते.. व ही ते जुमानत नाही म्हणून नवरा मारतो.. ती pregnant असताना..
२. अजून एक उदाहरण.. सासूला toliet sense असून वृध्दापकाळाने ती जायचा कंटाळा करते.. व सर्व आवरावे अशी सुनेकडून अपेक्षा.. न केल्यास नवरा मारहाण करतो..
३. सकाळ मधीलच एक बातमी : ४५ व्या वर्षी मूल झाले .. तेव्हाच त्या माणसाच्या मुलीला मुलगा झाला.. त्याची लाज वाटून स्वत:च्या नवजात मुलाला फ़ेकून दिले..

रोजच असे विरोधाभास असलेले अनेक प्रसंग दिसतात.. मनात कल्लोळ उमटतो.. !!

Thursday, November 5, 2009

इसे रिश्तोंका इल्जाम ना दो..




नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही
सा-याच चांदण्यांची जगतास जाग नाही..

या ओळी आठवाव्यात असे अनेक फ़ोन.. फ़क्त फ़ोन मॆत्री..

तो.. एक कलंदर माणूस …असावा.. ! भेटलो नाही कधी.. बोलतो फ़क्त.. आणि ते सुध्दा या जगातले असते असे नाही..

फ़ोन नं १ : वेळ : साधारण रात्री ११ ते २ च्या दरम्यान कोणतीही.. आणि फ़ोन कानाशी लागल्यावर ऎकू येते ती गिटार..मग गझल.. “आज जाने की जिद ना करो.. युंही पहलूमें बॆठे रहो.. “.. फ़ोनचे कारण काय तर एक विशिष्ट जागा फ़क्त female voice मध्येच चांगली वाटते. ती तेवढी तिने म्हणावी… मग तिने ती ऎकवली की आता एकदम फ़ार उशीर झाला आहे.. तू झोप आता.. आणि फ़ोन बंद..

फ़ोन नं २ : ती एका मित्राकडे.. काहीतरी गप्पा चालल्या आहेत. फ़ोन वाजतो.. आणि फ़ोनचे कारण काय तर.. त्याने एक फ़ुलपाखरु पाहिलेले व तिची आठवण आलेली.. ते सांगणे अपरिहार्य.. हो वेळ अगदी सभ्य…दुपारचे दोन.. (for a change)..

फ़ोन नं ३ : वेळ रात्री ९ ..ती drive करते आहे.. फ़ोन वाजतो.. ती अर्थातच घेत नाही. मग सिग्नलला फ़ोन पाहाते.. त्याचा दिसतो.. ती जरा पुढे जाऊन गाडी कडेला घेते.. व त्याला फ़ोन लावते.. गाडीत गाणे ’न जाने क्यूं’ मग फ़ोन सुरु झाल्यावर गप्पा फ़क्त सलील चौधरी..

फ़ोन नं ४: वेळ त्याच्या दॄष्टीने योग्य म्हणजे रात्रीचे १ किंवा दोन.. तो गोव्यात.. त्याला एक music album चे शूटींग आहे.. आणि बरेच दिवस लांबले होते.. ते काम आता चालू झाले आहे.. हे सांगण्यासाठी .. सोबतीला गिटार व हरिहरनचे.. “जब भी मिलते हो .. मुस्कुराते हो.. इतनी खुषियॉ कहांसे लाते हो.. “..

असे अनेक फ़ोन.. सुरुवातीला इतक्या रात्री उशीरा फ़ोन वगॆरे विचार होतेच.. पण हळूहळू ते मनाला कळले.. की ही फ़ोन मॆत्री.. बाकीच्या आयुष्यातील सुख दु:खांचा इथे विचार नाही.. हे एक असे पण नाते..