Wednesday, March 31, 2010

अज्ञात झ-यावर रात्री, मज ऎकू येतो पावा



“मृत्यू कुणाचीही कदर करत नाही. कशाचीही पर्वा बाळगीत नाही. जीवनात येणारे ते अनादी, अनंत आणि आंधळे असे चक्रीवादळ आहे.”… अमृतवेल.. वि.स.खांडेकर

विहीर..

हा सिनेमा पाहाताना सतत या वाक्याची आठवण येत होती. रक्ताच्या माणसाचा मृत्यू होईपर्यंत त्याचे गांभीर्य कळत नाही. तसे घडल्यानंतर आपण अचानक ’आयुष्यात ज्या गोष्टी नाहीत त्याची तक्रार करत असतो’ ते कमी होते. कारण जित्याजागत्या माणसाची उणीव कधी भरुन येणार नसते.. बाकीच्या गोष्टी मिळण्याची शक्यता तरी असते.. एखादे जिवलग माणूस आपल्या आधी जाईल आणि तो किंवा ती नसलेल्या जगात आपल्याला जगावे लागेल याची भीती ही सर्वात मोठी भीती असे मला वाटते.

विहीर च्या नामावलीत दि.बा.मोकाशी, जी.ए.कुलकर्णी व चिं.त्र्यं. खानोलकर यांचे आभार मानले आहेत. सिनेमाची कथा कोणत्या अंगाने जाणार याची कल्पना हे तीन लेखक वाचलेल्यांना येऊ शकते.

नचिकेत.. याची गोष्ट येते गरुड पुराणात. नचिकेताच्या वडिलांनी त्याला यमाला दिले आहे असे सांगितले. आणि यमाकडे जाऊन नचिकेताने मृत्यूवर विजय मिळवला अशी कथा आहे. जन्ममरणाच्या फ़े-यातून मुक्ती मिळवलेला नचिकेत एक पात्र होऊन या सिनेमात भेटतो. नातेवाईकांच्या गराड्यात त्याला गुदमरल्यासारखं वाटतं.. त्याला कुठेतरी पळून जायचं आहे.. तसंच आपण आहोत तसे कोणालातरी दिसलो नाहीत म्हणजे आपले अस्तित्व कुठे आहे.. असे अनेक प्रश्न व विचार तो मांडतो.. सगळ्यातून अलिप्त आणि तरीही सगळ्यांचा लाडका.. असे हे पात्र आहे. आलोक राजवाडे याने ती भूमिका उत्तम केली आहे. त्याच्या प्रत्येक entry मधे एक विशिष्ट आवाज ऎकू येतो.. ’अज्ञात झ-यावर रात्री, मज ऎकू येतो पावा’.. म्हणजे काय ते तो आवाज ऎकून कळले.

समीर.. म्हणजे स्वच्छंदी वाहणारा वारा.. इतरांसाठी तो चौकटीत वागतो. पण नचिकेताचे त्याला झपाटल्यासारखे आकर्षण आहे. तो ज्या वयात आहे.. त्या वयात असे झपाटलेपण असतेच.. नचिकेत खरा संवाद साधतो तो फ़क्त समीर सोबत.. पण तरीही नचिकेत समीर मधे गुंतलेला नाही.. सगळं सोडून तो जाणार आहेच.

तू पळून जाणार नाहीस असे समीर त्याला म्हणतो व नचिकेत फ़क्त मंद हसतो..

पोहोण्याच्या स्पर्धेसाठी एका दिवसासाठी समीर जातो व परत येतो तर दिसते ते नचिकेताचे प्रेत.. त्याच्या मनाला हा आघात सहन होणे शक्यच नसते.

तो पिसाटल्यासारखा वागतो. रात्री बेरात्री उठून नचिकेतला लिहितो.. नचिकेत त्याला न भेटता गेला याचे एक दु:ख सतत आहे. खरे तर असेही वाटले.. की तो गेला याचे दु:ख अधिक आहे.. की ’न सांगता’ गेला याचे ? काळजात जपलेल्या नात्यात फ़सवणुकीचे दु:ख नेहमी काळीज चरचरुन झोंबते…… !

समीरचा प्रवास.. बाहेरपासून आतपर्यंत कसा होतो ते बघण्यासारखे आहे. खरे तर कळून घेण्यासारखे आहे.

समीरचे काम मदन देवधर याने सुंदर केले आहे.

सिनेमात हे दोघे मावसभाऊ.. त्यांच्या अनुषंगाने येणा-या त्यांच्या आया.. म्हणजे बहिणी.. ते ज्या निमित्ताने सुट्टीत गावी भेटतात.. जिचे लग्न ठरले आहे ती मावशी.. एक ओली बाळंतीण.. एक भ्रमिष्ट आजी.. आजी आजोबा..मामा.. तो ऎकत असलेल्या वसंतराव देशपांडे यांच्या records.. त्याची खोली.. सगळाच वाडा.. समीरचे पुण्यातील राहते घर.. त्याचा जिना.. विशिष्ट झाडे.. सगळी पात्रेच आहेत. अगदी संवादात येणारा पण न दिसणारा तित्तिर पक्षी सुध्दा..

विहिर.. हे या सिनेमाचे नाव. त्यातील एक प्रमुख पात्र.. त्या विहिरीत ते दोघे पोहोतात. आणि त्याच विहीरीत नचिकेतचा मृत्यू होतो.. तिच्याच काठावर समीरला नचिकेत नंतरही एकदा बसलेला दिसतो.. विहीरीचे प्रतीक आयुष्याला दिले असावे का ? तेही असेच गूढ, काळोखे, तर कधी.. उबदार.. जीवन म्हणजे पाणी देणारे असे असते.. ?

यात फ़णस हा एक symbol म्हणून येतो.. समीरच्या पत्रात.. नंतर दोन वेळा.. मला त्याचा अर्थ उमगला नाही.

या सिनेमाचे background music.. आणि cinematography उत्कॄष्ट आहे.. या साठी तो थिएटर मध्येच पाहावा लागेल. प्रत्येक frame मनात ठसतेच.. त्यासाठी सिनेमा परत पाहावा असे वाटले.

सिनेमाच्या मध्यंतरात खुद्द Big B चे दर्शन घडले. नंतर गिरीश आणि उमेश कुलकर्णी यांना भेटता आले. (श्रेय माझा मित्र हर्षद..) त्यांना मी एकच सांगितले.. की एकदा बघून सिनेमा सगळा कळला असे वाटत नाही. तो परत पाहावा लागेल.

मात्र कोणतेही एक conclusion काढता येत नाही. सिनेमातून वेगवेगळे आपल्या मनाला पटतील असे अनेक अर्थ निघू शकतात.. ’आणि ते सुखाने नांदू लागले’.. असा शेवट अपेक्षित असणा-यांना हा सिनेमा आवडणार नाही कदाचित.. !! पण एकूण मनावर नंतर सिनेमाचा effect राहतो.. त्यावर आपण विचार व चर्चा करतो हेच त्याचे यश असते. तसे विहीरचे आहे.

Thursday, March 4, 2010

एकट्याने एकटे गर्दीत चालावे


एकट्याने एकटे गर्दीत चालावे
एकट्याने आपुल्याशी फ़क्त बोलावे

थांबते गर्दी फ़ुलांच्या उंब-यापाशी
एकट्याने आतूनी निर्माल्य हुंगावे

दार हे अपुले ति-हाईत होतसे जेव्हा
एकट्याने ओळखावे अन पुढे जावे

एकट्याला हाक येते रानपक्ष्याची
एकट्याने पाखरु प्राणांत झेलावे

लागते जावेच या अंधारयात्रेला
एकट्याने एकटा अपुला दिवा व्हावे

गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : श्रीधर फ़डके
गायक : अवधूत गुप्ते
अल्बम : संगीत मनमोही रे


एकांत, एकटेपणा, एकाकीपणा.. किती शब्द..

बेताबी क्या होती हॆ, पूछो मेरे दिलसे
तनहा तनहा लौटा हूं मॆं तो भरी महफ़िलसे..

या ओळी मला फ़ार आवडतात. गर्दीत असतानाचा एकटेपणा यात दिसतो.

एकट्याने एकटे गर्दीत चालावे
एकट्याने आपुल्याशी फ़क्त बोलावे
यात हा विचार आहे. खरे तर आपण हे करतच असतो कायम.. गर्दीत असताना कधी दुसरा माणूस काय विचार करत असेल याचा विचार केलाय ? कोणी त्रासलेला, चिडलेला, अस्वस्थ, आनंदात, व्याकुळ, व्यथेत.. दु:खात.. सगळे एकटेच.. आपण आपल्या माणसाबरोबर असलो तरी ते नुसतेच सोबत असणे होते अनेकदा.. आपण आपले एकटेच असतो. सोबत असलेल्या माणसाशी खरोखर बोलतो असे किती क्षण असतात ?

उधळून अलख निरंजन व्हावे असे किती जण भेटतात ?
सारे काही उधळून द्यावे असे किती क्षण भेटतात ?

…………………
दार हे अपुले ति-हाईत होतसे जेव्हा
एकट्याने ओळखावे अन पुढे जावे

मनाला चटका लावणा-या ओळी आहेत. याचा दाहक अनुभव ज्याने घेतला आहे…. काहीही केले तरी हाताला राखच लागते अशी संघर्षाची वर्षे ज्यांच्या आयुष्यात येतात त्यांना ’अपुले दार ति-हाईत’ कसे होते ते नीट कळेल. पण एकट्याने ते ओळखून पुढे गेलो अणि काही काळानंतर स्वकर्तॄत्वावर सर्व दारे आपल्याला ओळखायला लागली आणि काही दारे पायघड्या घालायला लागली की येथवर पोहोचल्याचा आनंद ही एकट्याला उपभोगता येतो. मग पुढे रानपक्ष्याची हाक ही ऎकू येतेच..
………………….

लागते जावेच या अंधारयात्रेला
एकट्याने एकटा अपुला दिवा व्हावे

ही अंधारयात्रा ति-हाईत दारापासून सुरू होते.. त्यात तो दिवा आपल्याला व्हावेच लागते.. आनंदाने व्हायचे की दु:खाने .. कटकट करुन ते फ़क्त आपण ठरवू शकतो. तुम्हीच सांगा कसं जगायचं.. यात पाडगावकरांनीच तो विचार नीट मांडला आहे. अंधारयात्रेला असे दोन वेळा म्हणताना… दुस-या वेळेला स्वर एकदम हळवा झाला आहे… तो एकदम भिडतो..
…………….

श्रीधर फ़डके यांचा हा नवीन अल्बम आला त्याला एक महिना होतोय.. या गाण्यातून उलगडणारे अनेक अर्थ अजून पुढे यायचे आहेत.. पण लिहायला त्या गाण्याने भाग पाडलं.. मधुमती मधला.. सुहाना सफ़र वाला दिलीप कुमार किंवा जमीर मधला फ़ूलोंके साये हॆ.. वाला अभिताभ.. एकटे आनंदाने निघालेत.. मनात एकटेपणाचा हळवेपणा असला तरी दु:ख नाही. तोच भाव या गाण्यात आहे. कवितांची निवड ही श्रीधर फ़डके यांच्या गाण्यात एक खासियत आहे.. या अल्बममधेही ते लक्षात येते.

Language... has created the word "loneliness" to express the pain of being alone. And it has created the word "solitude" to express the glory of being alone. ~Paul Johannes Tillich..

Tuesday, March 2, 2010

दिलसा कोई कमीना नही…



ऎसी उलझी नजर उनसे हटती नहीं, दात से रेशमी डोर कटती नही
उम्र कब की बरस के सफ़ेद हो गयी, कारी बदरी जवानी की छटती नही
वल्ला यह धडकन बढने लगी हॆ, चेहरे की रंगत उडने लगी हॆ
डर लगता हॆ तनहा सोनेमें जी…
दिल तो बच्चा हॆ जी, थोडा कच्चा हॆ जी
किसको पता था पहलू में रखा, दिल ऎसा पाजी भी होगा
हम तो हमेशा समझते थे कोई, हम जॆसा हाजी ही होगा
हाय जोर करे कितना शोर करे, बेवजह बातें पे गौर करे,
दिलसा कोई कमीना नही…
कोई तो रोके कोई तो टोके, इस उम्र में अब खाओगे धोके
डर लगता हॆ इश्क करने में जी, दिल तो बच्चा हॆ जी…१
ऎसी उदासी बॆठी हॆ दिल पे, हंसने से घबरा रहे हॆ
सारी जवानी कतरा के काटी, पीरी में टकरा गये हॆ
दिल धडकता हॆ तो ऎसे लगता हॆ वह, आ रहा हॆ यही देखता ही न वह
प्रेम की मारे कटार रे…
तौबा यह लम्हे कटते नही हॆ क्यूं , आंख से मेरी हटते नही हॆ क्यूं
डर लगता हॆ मुझसे कहने में जी, दिल तो बच्चा हॆ जी…. २

इश्कियां मधील हे राहत फ़तेह अली खान यांनी अतिशय उत्तम गायलेले गाणे.. काहीसे ६० च्या दशकातील गाण्यांच्या संगीताची आठवण करुन देणारे. यात मधेच अरेबिक संगीत आहे.. विशाल भारद्वाज यांचे या चित्रपटातील मला हे गाणे सर्वात जास्त आवडले आहे.
गुलजार यांच्या नेहमीच्या शॆलीतील गाणे आहे.. त्यांनी ते सहज लिहिले असावे.. गदिमांची गीते कशी .. ’झाला महार पंढरीनाथ, काय द्येवाची सांगू मात’… मध्ये गावरानपणा व ’निजरुप दाखवा हो’ मधे एक सदाशिव पेठी बाज आणतात.. तसे’प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम ना दो’.. व ’दिलसा कोई कमीना नही’ मध्ये गुलजार यांचे झाले आहे.. दोन्ही प्रेमाचीच गाणी पण.. इश्किया मधील भाषा हा एक स्वतंत्र विषय आहे. त्यात हे गाणे चपखल बसते.
अर्धसत्य मधला लोबो, त्रिदेव चा ओये ओरडणारा नायक, मासूम मधला जेके, मंडीमधला तुंद्रूस.. नसिरुद्दीन शहा यांचे किती रोल्स आठवावेत.. इश्किया मधे त्यांचा अभिनय उत्तम आहेच.. पण दिल तो बच्चा हॆ हे गाणे व नंतर एक सत्य कळल्यावरचा अर्धा तास दुखावलेपणाचा अभिनय केवळ अप्रतिम.. मनात गाणे घर करुन राहाते.. एक ठसठसती जखम असावी तसे..