
रंग किरमिजी
सांज ति-हाईत
मी दुखणाईत
दिठीतली सल
अंधुक चंचल
बघ आंदोलीत
विझता तगमग
आलीस तू मग
पदर सावरीत
क्षण उजळावा
चंद्र फ़िरावा
हीच नसे रीत
जिवलग हात
मूर्तिमंत घात
दंश सराईत
आता सांजरंग
काळीज दुभंग
मना जोजवीत
तुझ्याच पाऊली
जुन्याच चाहुली
कण बोलवीत
आठ्वांचे पीस
गमते आकाश
चंद्र सजवीत
कुठले कुठ्ले
उठ्ले काहूर
मग दूरवर
क्षण पाजळीत
आयुष्य वेल्हाळ
मन रानोमाळ
कुठे हारजीत
सुटलेला शर
खोल खोलवर
तोच मनमीत
चाललो चाललो
काठाशी बोललो
जिवा उधळीत
प्रवीण दवणे..
'हे गगना' यातील माझे हे सर्वात लाड्के गाणे. स्वत: श्रीधरजीच याचे वर्णन सांगताना..एक भग्न ह्रुदयी माणूस एकटाच संध्याकाळी गात चालला आहे...असे सांगतात. कविता फ़ार भावपूर्ण आहे. मनाला भिडणारी आहे.संध्याकाळ ही नेहमीच कातर करून जाते. 'भूली बिसरी चंद उम्मीदे चंद फ़साने याद आये'..असं नेहमी संध्याकाळीच होते.
या गाण्यातील शब्द अप्रतिम आहेत. 'तगमग' हा शब्द ऎकताना जिवाची 'तगमग' होते. शब्द योग्य पोचावेत अशी चाल आहे..वाद्यांचा संयत वापर 'जमला' आहे..
यातील शेवटचं कडवं ऎकताना..
हुई शाम उनका खयाल आ गया
वही जिंदगीका सवाल आ गया..
हे किती खरं आहे ते कळ्तं. 'दुखणाईत' हा शब्द गीतरामायणात 'लीनते चारुते सीते' मध्ये आहे..
जो दुखणाईत नेत्रांचा
दीपोत्सव त्याते कॆचा..
त्यानंतर मी तरी याच गाण्यात ऎकला. एकूण हे स्वत: श्रीधरजींचे लाडके गाणे असावे. ते हे गाणे फ़ार मन लावून गातात. मनस्वीपणा हे त्यांच्या गायनाचे वॆशिष्ट्य आहे. सर्व गाण्यात ते जाणवितेच...यात एक शीळ आहे..तीही चपखल बसते. आनंदी मूड मध्ये आणि विषण्ण मूडमध्ये शीळ वाजवण्यात काय फ़रक आहे ते कळ्ण्यासाठी ही शीळ ऎकावी...
किशोरकुमारच्या 'बडी सूनी सूनी हॆ' ऎकल्यावर जसं एक खोल रितेपण एकलेपण..'तनहा' अवस्था येते ती या गाण्याने येते. या पॆलूतून परत एकदा 'तलत मेहमूद' यांचं 'शाम ए गम की कसम' आठ्वतं..
कोणावर असं ह्रुदयभंगाचं दु:ख येऊ नये असं कळवळून वाटावं इतकं दु:ख 'रंग किरमिजीतून' झिरपतं....
सांज ति-हाईत
मी दुखणाईत
दिठीतली सल
अंधुक चंचल
बघ आंदोलीत
विझता तगमग
आलीस तू मग
पदर सावरीत
क्षण उजळावा
चंद्र फ़िरावा
हीच नसे रीत
जिवलग हात
मूर्तिमंत घात
दंश सराईत
आता सांजरंग
काळीज दुभंग
मना जोजवीत
तुझ्याच पाऊली
जुन्याच चाहुली
कण बोलवीत
आठ्वांचे पीस
गमते आकाश
चंद्र सजवीत
कुठले कुठ्ले
उठ्ले काहूर
मग दूरवर
क्षण पाजळीत
आयुष्य वेल्हाळ
मन रानोमाळ
कुठे हारजीत
सुटलेला शर
खोल खोलवर
तोच मनमीत
चाललो चाललो
काठाशी बोललो
जिवा उधळीत
प्रवीण दवणे..
'हे गगना' यातील माझे हे सर्वात लाड्के गाणे. स्वत: श्रीधरजीच याचे वर्णन सांगताना..एक भग्न ह्रुदयी माणूस एकटाच संध्याकाळी गात चालला आहे...असे सांगतात. कविता फ़ार भावपूर्ण आहे. मनाला भिडणारी आहे.संध्याकाळ ही नेहमीच कातर करून जाते. 'भूली बिसरी चंद उम्मीदे चंद फ़साने याद आये'..असं नेहमी संध्याकाळीच होते.
या गाण्यातील शब्द अप्रतिम आहेत. 'तगमग' हा शब्द ऎकताना जिवाची 'तगमग' होते. शब्द योग्य पोचावेत अशी चाल आहे..वाद्यांचा संयत वापर 'जमला' आहे..
यातील शेवटचं कडवं ऎकताना..
हुई शाम उनका खयाल आ गया
वही जिंदगीका सवाल आ गया..
हे किती खरं आहे ते कळ्तं. 'दुखणाईत' हा शब्द गीतरामायणात 'लीनते चारुते सीते' मध्ये आहे..
जो दुखणाईत नेत्रांचा
दीपोत्सव त्याते कॆचा..
त्यानंतर मी तरी याच गाण्यात ऎकला. एकूण हे स्वत: श्रीधरजींचे लाडके गाणे असावे. ते हे गाणे फ़ार मन लावून गातात. मनस्वीपणा हे त्यांच्या गायनाचे वॆशिष्ट्य आहे. सर्व गाण्यात ते जाणवितेच...यात एक शीळ आहे..तीही चपखल बसते. आनंदी मूड मध्ये आणि विषण्ण मूडमध्ये शीळ वाजवण्यात काय फ़रक आहे ते कळ्ण्यासाठी ही शीळ ऎकावी...
किशोरकुमारच्या 'बडी सूनी सूनी हॆ' ऎकल्यावर जसं एक खोल रितेपण एकलेपण..'तनहा' अवस्था येते ती या गाण्याने येते. या पॆलूतून परत एकदा 'तलत मेहमूद' यांचं 'शाम ए गम की कसम' आठ्वतं..
कोणावर असं ह्रुदयभंगाचं दु:ख येऊ नये असं कळवळून वाटावं इतकं दु:ख 'रंग किरमिजीतून' झिरपतं....
No comments:
Post a Comment