Tuesday, March 25, 2008

अवेळीच केव्हा दाटला अंधार


अवेळीच केव्हा दाटला अंधार
तिला गळा जड झाले काळे सर
एकदा मी तिच्या डोळ्यात पाहिले
हासताना नभ कलून गेलेले

पुन्हा मी पाहिले तिला अंगभर
तिच्या काचोळीला चांदण्याचा जर
आणि माझा मला पडला विसर
मिठीत थरके भरातील ज्वार

कितीक दिसांनी पुन्हा ती भेटली
तिच्या पोटी कुण्या राव्याची सावली
जरा डोळियांत तिच्या मी पाहिले
काजळात चंद्र बुडून गेलेले

ना.धों.महानोर

या गाण्याबद्दल लिहीण्याची इच्छा खूप होती पण धीर होत नव्हता. मला याचा अर्थ जो वाटतो तो लिहिण्याचा प्रयत्न करते आहे. कोणी वेगळे काही interpret केले असेल तर जरुर सांगा.

या कवितेतील 'ती' त्याची प्रेयसी असावी. तिचे तिच्या मनाविरुध्द लग्न झाल्यामुळे.. 'तिला गळा जड झाले काळे सर'..आणि मग त्याच्या आयुष्यात 'अवेळीच दाटला अंधार'... अनेक दिवसांनी अवचित भेटल्यावर तिच्या विषण्ण हासण्याचे वर्णन 'हासताना नभ कलून गेलेले' यात येते. 'कलून' हा शब्द ऎकताना मनात कालवाकालव होते इतका अप्रतिम गायला गेला आहे.

तिला लग्नानंतर पाहिल्यावर 'ती' आधी 'त्याची' असल्याने तो तिच्याकडे बघतो.. ते वर्णन पहिल्या कडव्यात आहे. यात 'अंगभर', 'तिच्या काचोळीला चांदण्याचा जर' तसेच 'थरके ' हे श्रीधरजींचे उच्चार ऎकल्यावरच कळेल की ते किती भावपूर्ण, शब्दांना न्याय देणारे गाणे गातात. 'थरके' मध्ये ते बेभान थिरकणे जाणवतेच..

दुसर्या कडव्यात तिला झालेले मूल दुसर्याचे आहे..यामुळे तिच्या डोळ्यातील चंद्र बुडून म्हणजे दु:खात काजळून गेले आहेत. 'कितीक दिसांनी'..ऎकताना विदग्ध, एकलेपणाची व्यथा कळेल असे सूर आले आहेत. फ़ार जीवघेणे वर्णन या गाण्याच्या शब्दात आहे.. ते तितकेच खोल गाण्यातूनही पोहोचते. 'रंग किरमिजी' याच धर्तीचे नंतरचे गाणे..तेही असेच एक 'जमलेले' गाणे आहे.
अशी गाणी ऎकल्यानंतर दीर्घकाळ एक कातर मूड अंतर्मनात रहातो.. तेच त्याचे खरे यश असते.

3 comments:

Unknown said...

arth chukalaa naahee.
paN hee kavita vaachataanaa thodee rachanaa badal. mhaNaje ase ki, pahilyaa 2 oLee tisaryaa charaNaabarobar waach aaNi dusaryaa 2 oLee tyaapudhachyaa charaNaabarobar salag vaach.
arth adhik nemakaa haatee laagel, ase waaTate.

Sudhakar......... said...

Khup chchan Neela..
Khali dilelya thikani sudhdha ashach aashayache varnan adhalale..

http://www.maayboli.com/hitguj/messages/35/82534.html?1113202909

Ashutosh Bapat (आशुतोष बापट) said...

साधारण् अर्थ असाच आहे. तरीही प्रत्येक उपमेचा अर्थ लागत नाहीये. मला गाणं ऐकून वाटलं की ते ह्ुदयनाथनी म्हटलं आहे. आवाज अगदी‌ तलम आणि गोड आहे. इथे ते श्रीधर फडकेंनी म्हटलं आहे हे कळालं. धन्यवाद.